DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: नंदकिशोर मेश्राम
चंद्रपूर :- बारावीचे पेपर द्यायला परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला.चार विद्यार्थी ,तीन शिक्षक जखमी झालेत.ही घटना राजुरा तालुक्यातील पेलोरा येथे आज घडली. या घटनेत सुरज भिमनकर , तेजस मुके, दीपक उमरे, हे विद्यार्थी जखमी झाले तर मोरेश्वर लांडे सह अजून दोन शिक्षक जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली येथे हलविण्यात आले. एका विद्यार्थ्यांनी उपचारानंतर पेपर दिला. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा या परीक्षा केंद्रावर बारावीचे विद्यार्थी पेपर सोडवायला गेलेत. या केंद्रावर ९६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.मात्र प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.



