DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- गुलाबराव भदाने
जळगाव:- काल संध्याकाळी जळगाव जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबले व काही घरात पाणी घुसले त्यामुळे तेथील रहिवाशांचे संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने वेळीच दाखल घेऊन त्यांना योग्य ती मदत करावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तेथील नागरिक मागणी करत आहेत.



