DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
बिलोली येथील सर्व स्मशानभूमीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अंतविधीच्यावेळी उजेड करण्यासाठी घेऊन जावे लागत आहे चार चाकी वाहने
नांदेड:- बिलोली शहरातील सर्व स्मशानभूमी च्या ठिकाणी लाईट ची सोय नसल्याने नगर परिषदेचे जाणून-बुजून दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून अंधारामध्ये अंत्यविधी होत आहेत ज्या घरच्या माणसाचे निधन झालेले असते त्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी गेल्यानंतर कंदील मोबाइल टॉर्च किंवा चार चाकी वाहनाच्या लाईटचे उपयोग करून रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये अंतविधी करण्यात येत आहे या ठिकाणी जर कोणाला दुःख पद झाली किंवा कोणाला कशाचाही दश झाला तर याचे जबाबदार कोण या स्मशानभूमीची बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार प्रसारित झाल्या असून सुद्धा याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तरी येणाऱ्या 26 जानेवारी पर्यंत जर संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जर लाईटची सोय तिथे करीत नसेल तर येणाऱ्या 26 जानेवारी रोजी महात्माचा आदर्श घेऊन मुख्य रस्त्यावरती भीक मागून नगरपरिषद यांना पैसे नेऊन देणार अशी चर्चा गावातील नव तरुणांकडून होत आहे.



