DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️प्रतिनिधी – राजेंद्र पवार
सांगली :- मिरज किल्ला भागातील बांधकाम अपघातात मजुरांचा बळी गेल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट)ने संताप व्यक्त केला आहे. जिल्हाध्यक्ष पै. विशालसिंग रजपूत यांनी खुशी-1 इमारतीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी केली आहे.
रजपूत यांनी सांगितले की, बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा यंत्रणा न लावता मजुरांना कामाला लावले जाते, हे दुर्लक्षामुळे झालेले अपघात नसून निष्काळजीपणामुळे झालेले मृत्यू आहेत. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणामुळे किल्ला भागात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.



