प्रतिनिधी : शांताराम दुनबळे
नाशिक – पेठ – धरमपुर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वर चाचडगाव नजीक टोलनाका बसवतांना पेठ तालुका वासीयांकडून होणाऱ्या टोल वसुलीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत दोन तासाहून अधिक वेळ रास्ता रोको केला…
नाशिक – पेठ – धरमपुर महामार्गासाठी पेठ तालुकावासीयांनी जमीनी दिल्या आहेत. रस्ता निर्माण कालावधीत प्रचंड त्रास सोसुनही वाहनांचा कर माफ करण्याऐवजी कर आकारणी होत असल्याने अनेक दिवसांपासून येथील नागरिकांचा उद्रेक वाढत होता. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.
तसेच दिंडोरी व पेठचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर आणि पो. उपअधीक्षक अमोल गायकवाड यांच्या समक्ष चर्चा केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
यावेळी भास्कर गावीत, माजी आमदार धनराज महाले नगराध्यक्ष करण करवंदे, विशाल जाधव, याकुब शेख, जाकीर मनियार, माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे, विलास अलंबाड, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .



